Wednesday, May 17, 2023

स्तोत्र पाठांतर

लहानपणी जबरदस्तीने आरत्या, गीतेचे श्लोक, मनाचे श्लोक, एक ना अनेक स्तोत्र म्हणायचे..

कधी शाळेत सांगितले म्हणून, आईबाबा सांगतात म्हणून, तर कधी पद्धत म्हणून..

नंतर अनेक वर्षे कोणीही, कशाचीच जबरदस्ती केली नाही..

पण दैनंदिन गोष्टीत त्रास झाला, वैताग आला किंवा नकारात्मक विचार येऊ लागले की खोलवर राहिलेल्या,निद्रिस्त वाटणाऱ्या या गोष्टी नव्याने जाग्या होतात..

चुकीच्या विचारांशी लढा देतात, आपल्याला पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतात..

अर्थात हा माझा अनुभव, सगळ्यांना यायला हवाच असे नाही..

आजच्या पिढीला काहीही करताना, त्यामागची कारणे हवी असतात, तीही तर्कशुद्ध (लॉजिकल)..

सांगितले म्हणून करावे, असे शिकलेली माझी पिढी अनेकदा यात कमी पडते, कारण जी कारणे विचारली नाहीत, प्रसंगाने अनुभवली ती सांगणार कशी..

ज्ञानेश्वर माऊली म्हणातत, एक तरी ओवी अनुभवावी..

करोना काळात स्तोत्र पठण, दीप प्रज्वलन, थाळी वादन एक ना अनेक गोष्टी सर्वांनीच केल्या..

त्याने करोना गेला..?

इतके अवैज्ञानिक विचार नक्कीच नाही..

त्यातून मानसिक ऊर्जा तयार झाली, तीने शरीराला अधिक सक्षम केले..

अनुभवाने हे ज्याचे त्याला सापडते, पण सार्थ गोष्टी जास्त परिणामकारक असतात, म्हणून आज एका आवडत्या रचनेचा मला भावलेला अर्थ मांडण्याचा प्रयत्न करणार आहे,

रचना स्वामी रामदासांची..

वैयक्तिक संसार न करता, विश्वाला आनंदी संसाराची गुरुकिल्ली देणारे, रामदास स्वामी मला नेहमीच प्रभावित करतात..

त्यांच्या अनेक रचनांपैकी करुणाष्टके ही त्यांनी स्वतःसाठी प्रभू रामरायाकडे केलेली आळवणी आहे..

त्यातला भाव करुण असला तरी त्यात दुःख, वेदना नसून, प्रचंड ऊर्जा आणि गोडवा आहे..

रचना मोठी असल्याने एकत्रित कंटाळवाणी होऊ नये म्हणून, तीन भागात ही मांडणी करणार आहे..

फक्त रचना..

पुढे वाचण्यासाठी..

https://abhigandhashali.blogspot.com/2023/05/blog-post_18.html 

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome